15ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मराठी/इंग्रजी भाषणे


 स्वातंत्र्य दिन मराठी भाषणे -1

“ज्याचा मुकूट आहे हिमालय,

जिथे वाहते गंगा…

जिथे आहे विविधतेत एकता,

सत्यमेव जयते आहे आमचा नारा ….

जिथे धर्म आहे भाईचारा

तोच आहे भारतदेश आमचा….!”


आज १५ ऑगस्ट ! आपण सर्वजन इथे आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत.

तर सर्वप्रथम, तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या खूप- खूप शुभेच्छा !

१५ ऑगस्ट हा भारताच्या सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे. तसेच भारताचा एक राष्ट्रीय सण आहे.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला.

आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी मोलाचे योगदान दिले. आपण सर्वांनी त्यांचा आदर केला पाहिजे.

त्या सर्व शुर स्वातंत्र्य सैनिकांमुळे आज आपण आपल्या देशात मुक्त श्वास घेत आहोत.


या दिवशी देशाचे पंतप्रधान राष्ट्रध्वज फडकवितात व तसेच राष्ट्रध्वजास २१ तोफांची सलामी दिण्यात येते.


तसेच या दिवशी सर्व शाळा, महाविद्यालये व कार्यालयांमध्ये ध्वजारोहण, ध्वजवंदन व देशभक्ती वर कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

मला माझ्या भारत देशाचा अभिमान आहे, आपण सर्वांनी मिळून भारत देशाला जगातील एक चांगला देश बनवण्याची प्रतिज्ञा करू.

शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते :-


तिरंगा आमुचा ध्वज,

उंच उंच फडकवू….

प्राणपणाने लढून आम्ही,

शान याची वाढवू….



बोला – भारत माता की जय !

वंदे मातरम् ! वंदे मातरम् !



स्वातंत्र्य दिन मराठी भाषणे 2

भाषण 2


“उत्सव तीन रंगांचा….

आभाळी आज सजला !

नतमस्तक मी त्या सर्वांचा….

ज्यांनी भारत देश घडवला !!”


सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजनवर्ग आणि येथे उपस्थित माझ्या प्रिय देशबांधवांनों सर्वांना माझा नमस्कार !



आज १५ ऑगस्ट ! आपण सर्वजन आज इथे भारताचा ७७ वा ‘स्वातंत्र्य दिन’ साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. सर्वप्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप-खूप शुभेच्छा !


मित्रांनी, १५ ऑगस्ट हा दिवस भारतातील प्रत्येक नागरिकासाठी उत्साहाचा, सन्मानाचा व अभिमानाचा आहे. १५ ऑगस्ट १९४७ ला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. हा दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिन होय. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले.


महात्मा गांधी, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक, भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, राणी लक्ष्मीबाई सरदार बल्लभभाई पटेल, मंगल पांडे अशा अनेक क्रांतिकारकांनी आपले प्राण पणाला लावले.


आज आपण मुक्तपणे श्वास घेतोय त्याचे सर्व श्रेय या देशपुत्रांचे आहे. अशा या थोर स्वातंत्र्य सैनिकांना माझे नमन ….


आजच्या या मंगल दिनी भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवितात. हा सण मोठ्या उत्साहात शाळा व महाविद्यालयात साजरा केला जातो. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मिरवणुका काढल्या जातात. घोषणा दिल्या जातात. सगळीकडे देशभक्तीची गाणी लावली जातात.


स्वातंत्र्यानंतर भारताने खूप प्रगती केली आहे. विविधतेत एकता हे भारताचे वैशिष्ट्य आहे. परंतु तरीही आपल्या देशात अनेक समस्या आहेत. त्यावर देशातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन मात केली पाहिजे.


चला तर मग आपण सर्वजण एकत्र येऊन भारताला एक आदर्श व सर्वोत्तम देश बनवूया. शेवटी मी एक छोटीशी कविता बोलून माझे भाषण संपवते :-


तिरंगा आमुचा भारतीय झेंडा….

उंच-उंच फडकवू !

प्राणपणाने लढून आम्ही….

शान याची वाढवू !!


जय हिंद ! जय भारत !!


स्वातंत्र्य दिन भाषणे  pdf download करा

       Click Here 

--- १. भाषण आजचा दिवस आपल्या देशाच्या इतिहासातील सुवर्णदिन आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिल्यामुळे आपण स्वातंत्र्याचा श्वास घेत आहोत. चला, आपण त्यांचा सन्मान करूया. जय हिंद! चारोळी "शहीदांचा त्याग मोठा, स्वातंत्र्याची हीच गोष्टा, तिरंगा लहरत राहो, भारत माता अमर राहो!" --- २. भाषण स्वातंत्र्य दिन आपल्याला एकतेचा आणि देशभक्तीचा संदेश देतो. तिरंगा आपला अभिमान आहे. आपण एकत्र राहून देशाची प्रगती घडवूया. वंदे मातरम्! चारोळी "नभात तिरंगा उंच उडतो, देशभक्तीचा संदेश देतो, भारत माझा प्राण, माझं स्वप्न, माझा मान." --- ३. भाषण १५ ऑगस्टला आपण आपल्या वीरांच्या त्यागाची आठवण ठेवतो. चला, आपणही प्रामाणिक, कष्टाळू आणि देशप्रेमी नागरिक बनूया. जय हिंद! चारोळी "देशासाठी प्राण दिले, वीरांनी बलिदान केले, आपण त्यांचे ऋणी आहोत, भारत माझा प्राण आहे." --- ४. भाषण स्वातंत्र्य ही अमूल्य देणगी आहे. ती जपण्यासाठी आपल्याला शिक्षण, प्रामाणिकपणा आणि एकता हवी. वंदे मातरम्! चारोळी "माझा देश, माझा अभिमान, भारत माता माझा प्राण, तिरंगा सदैव फडकतो, स्वातंत्र्याचा जयघोष होतो." --- ५. भाषण आजचा दिवस आनंदाचा आहे. आपल्या देशाने अनेक संघर्ष करून स्वातंत्र्य मिळवले. चला, आपण देशभक्तीने परिपूर्ण होऊया. जय हिंद! चारोळी "स्वातंत्र्याची गाथा गाऊ, तिरंगा उंच फडकवू, वीरांच्या बलिदानाची, कथा जगाला सांगू." --- ६. भाषण स्वातंत्र्य दिन फक्त सण नाही, तो आपल्या जबाबदारीची आठवण आहे. चला, आपण देशासाठी काहीतरी चांगलं करूया. वंदे मातरम्! चारोळी "रंग तिरंग्याचे तेज पसरवी, वीरांचा अभिमान वाढवी, भारताची शान जपूया, स्वातंत्र्याचा मान ठेवूया." --- ७. भाषण आपल्या पूर्वजांनी अनेक त्याग केले. आपण त्यांचं स्वप्न पूर्ण करायला हवं — शिक्षित आणि एकत्र भारत. जय हिंद! चारोळी "स्वातंत्र्याची राखण करू, तिरंग्याला वंदन करू, वीरांच्या बलिदानाला, सदैव स्मरण ठेऊ." --- ८. भाषण १५ ऑगस्ट हा आपल्या स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. गुलामीतून मुक्त झालेल्या भारताचा हा पहिला श्वास होता. चला, त्याचा सन्मान करूया. वंदे मातरम्! चारोळी "भारत माता जयजयकार, वीरांचा करा सत्कार, तिरंगा उंच नेहमी फडकवा, देशभक्तीने हृदय सजवा." --- ९. भाषण स्वातंत्र्य दिन आपल्याला सांगतो — "एकतेत बळ आहे". आपण जात, धर्म न पाहता देशासाठी एकत्र राहूया. जय हिंद! चारोळी "एकतेचा ध्वज उंच धरू, देशप्रेमाची शपथ घेऊ, भारत माझा प्राण आहे, स्वातंत्र्य माझा मान आहे." --- १०. भाषण आपण स्वतंत्र आहोत कारण कुणीतरी आपल्या साठी झगडलं. चला, त्यांचं ऋण फेडूया — प्रामाणिकपणे काम करून. वंदे मातरम्! चारोळी "वीरांचा जयघोष करुनी, तिरंगा उंच फडकवूनी, देशासाठी जगू, भारताला प्रगतीकडे नेऊ." --- इंग्रजी भाषण pdf

Post a Comment

Previous Post Next Post